कणकवली | प्रतिनिधी
प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत कणकवली शहरात वंचित घटकांच्या आयुष्यात उजेड घेऊन येणारा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. नगराध्यक्ष मा. संदेशजी पारकर व नगरसेवक लुकेश कांबळे यांच्या पुढाकारातून शहरातील गरीब व वंचित कुटुंबांच्या घरात अखेर वीज कनेक्शन देण्यात आले.
वनिता महादेव कांबळे, सरिता गोपाळ हिंदळेकर व चंद्रभागा जाधव या कुटुंबांच्या घरात आजवर वीज नव्हती. यापैकी एक रमाई घरकुल (२०१६–१७) व दुसरे घरकुल (२०२२–२३) असतानाही वीज कनेक्शन मिळाले नव्हते. तर जाधव कुटुंबाच्या घराला तब्बल ४ ते ५ दशकांपासून वीज कनेक्शन नव्हते.
नगरपंचायत निवडणुकीदरम्यान “२६ जानेवारी रोजी मीटर बसवू” असा दिलेला शब्द नगराध्यक्ष मा. संदेशजी पारकर यांनी प्रत्यक्ष कृतीतून पूर्ण करून दाखवला. त्यामुळे प्रजासत्ताक दिनी या कुटुंबांच्या घरात पहिल्यांदाच उजेड पडला.
यावेळी समाजभूषण तानाजीराव कांबळे, समतादूत अॅड. सुदीप कांबळे, जयश्रीताई कांबळे, उमेश वाळके, सौरभ पारकर, श्रीपाद सापळे, सतीश कांबळे, बाबुराव कांबळे, अनिल जाधव, समीर कांबळे, राजरतन कांबळे, पंढरी जाधव, विलास कांबळे, गौतम कांबळे, सत्यवान कासले, गणेश जाधव, संदीप ओंबळकर तसेच वीज वितरण कंपनीचे कर्मचारी उपस्थित होते.
सेवाभाव, संवेदनशीलता आणि विकासाची ठोस पावले हीच या उपक्रमामागील प्रेरणा असून, समाजातील शेवटच्या घटकापर्यंत मूलभूत सुविधा पोहोचवण्याचा निर्धार यानिमित्ताने पुन्हा अधोरेखित झाला.







